बलवंत मराठा
बलवंत मराठा
मराठी मनाचा मानबिंदू
बातमी १ सप्टेंबर २०२३
पालघर प्रतिनिधी l दापचरी दुग्ध प्रकल्पातील 150 कुटुंबांना ;सरकारने बजावली घर सोडण्याची नोटीस बजावली आहे.
Palghar Dapchari Dairy Project : पालघर मधील दापचरी येथील दुग्ध प्रकल्पात राहणाऱ्या 160 पेक्षा अधिक कुटुंबांना आपले घर आणि युनिट खाली करण्याच्या नोटिस देण्यात आली आहे:
: १९६० सली राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्यातील विविध भागातून आलेल्या दुग्ध प्रकल्पातील (Dapchari Dairy Project) 150 हून अधिक कुटुंबीयांना दापचरी दुग्ध प्रकल्पातील घर आणि युनिट खाली करावे लागणार आहे.
मुंबई आणि ठाणे सारख्या शहरांना मुबलक दुग्ध पुरवठा व्हावा म्हणून तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी या भागातील जवळपास सहा हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात आलाी. या ठिकाणी दुग्ध प्रकल्प उभारण्यात आला. हा प्रकल्प सुस्थितीत चालावा म्हणून त्यावेळेस जाहिरात काढून राज्यातील शेतकऱ्यांना येथे येऊन दुग्ध व्यवसाय करण्याचा आवाहन करण्यात आलं. मात्र कालांतराने हा उभा राहिलेला प्रकल्प निष्काळजीपणामुळे डबघाईला गेला. अनेक युनिट धारकांनी दूध उत्पादन थांबविले.काहींनी या युनिट परस्पर विकल्या. तेथे धनदांडगे सुट्टीच्या दिवशी मौज मजा करण्यास येतात.अनेक युनिट राजकीय नेते व शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली आहेत.
काही लाभधारकांनी निवास व युनिट चे भाडे,लाईट बिल,पाणी बिल देखील भरले नाही .गेली अनेक वर्ष हे काही मोफत राहतात. या मुळे शासनाचे खूप नुकसान होत आहे.
दापचरी येथील दुग्ध प्रकल्पात राहणाऱ्या 160 पेक्षा अधिक कुटुंबांना आपले घर आणि युनिट खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून हे कुटुंबिय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन या ठिकाणी वास्तव्यास आहेत.
१९६० च्या दशकात पालघरच्या डहाणूतील दापचरी येथे हजारो हेक्टर जमीन राज्याच्या दुग्धविकास प्रकल्पाने ताब्यात घेतली. ज्या जमिनीवर दुग्ध प्रकल्प उभारण्यात आला, त्या ठिकाणी मुंबई, ठाणे या महानगरांसह महाराष्ट्रात येथील दूध नेण्यासाठी या ठिकाणी 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना प्रत्येकी एक हेक्टर जमीन देण्यात आली. यात काही संकरीत गायी ही देण्यात आल्या. मात्र, पुढे हाच प्रकल्प डबघाईला गेला .दूध उत्पादन बंद झाले.त्या मुळे मुळ उद्देश बाजूला राहिला व हे युनिट परस्पर विकले गेले.काही तेथे शेती करतात,तर काहींनी युनिट भाड्याने दिली आहेत
सरकारने वृत्तपत्रात जाहिरात काढत महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना या दुग्ध प्रकल्पात जमीन घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार राज्याच्या कानाकोपऱ्यातून 200 पेक्षा अधिक कुटुंब या ठिकाणी स्थलांतरित झाले होते.. मात्र, आता अचानक अवघ्या पंधरा दिवसात या कुटुंबांना घर खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यात. आता प्रकल्पातील कुटुंबांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
मुंबई, ठाणे या महानगरांमधील दूध प्रश्न सुटावा तसेच अनेक बेरोजगार कुटुंबांना रोजगार मिळावा म्हणून या दुग्ध प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. मात्र गेली अनेक वर्ष येथे दूध उत्पादन होतच नाही. सध्या हा प्रकल्प डबघाईला आला आहे..करोडो रुपये खर्चून हा प्रकल्प उभारला पण त्याचा फायदा मात्र झाला नाही. त्यामुळे हजारो हेक्टर असलेली जमीन कोणाचे उपयोगात येणार आहे हे त्या काळातच स्पष्ट होणार आहे.
आता त्या ठिकाणी इतर काही प्रोजेक्ट उभारला जाऊ शकतो. सरकार त्या दृष्टीने प्रयत्नसंवरक्षन शिल आहे.
संवरक्षन खात्याला ही जागा दिली जाऊ शकते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा